भविष्यातील महामारींचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे   

प्रा. चेतन्य आठले यांचे आवाहन 

पुणे : भविष्यातील महामारींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी नागरिकांसह प्रशासन, आरोग्यसेवा आणि संशोधन संस्था सज्ज राहाव्यात, असे आवाहन भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थानचे (आयआयएसईआर) प्रा. चेतन्य आठले यांनी गुरुवारी केले. कोरोनाकाळात वैज्ञानिक दृष्टिकोनाची जनजागृती असती तर वेदनांचे प्रमाण कमी झाले असते, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘जैवशास्त्र आणि महामारीचा रोख’ या विषयावर प्रा. चैतन्य आठले बोलत होते. 
 
आठले म्हणाले, कोराना विषाणूमुळे जगभरात महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. या सूक्ष्मजीवापासून सुटकारा मिळविण्यासाठी नागरिक, प्रशासन, आरोग्यसेवा, संशोधन संस्था कामाला लागल्या होत्या. त्यात पुण्यातील सिरम व भारत बायोटेक संशोधन संस्थांनी लशींची निर्मिती करुन जगभर पोहोचवल्या, त्यामुळे मोठा दिलासा त्यावेळी नागरिकांना मिळाला होता. एकादा आजार आल्यानंतर त्यावर संशोधन करण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यावर अनेक प्रयोग करावे लागतात. ब्रिटीश राजवटीत असताना भारतात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी ब्रिटीशांनी हा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. अनेक वर्षांनंतर जगभरात कोरोना आजाराचे संकट आले. हे संकट रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक संशोधन संस्था कामाला लागल्या होत्या. विषाणूच्या संशोधनासाठी भारत पुढे होता, असेही यावेळी आठले यांनी सांगितले.
 
विषाणू म्हणजे काय? हे आपण समजून घेतले पाहिजे. सजीव प्राणी, हवा, पाणी, माती आणि श्वासात बहुतांश विषाणू असतो. विषाणू हा संसर्गजन्य असून तो पेशाीत वाढतो. त्याला पेशी मिळाल्या नाहीत, तर तो वाढू शकत नाही. एपिडेमिक, पँडेमिक, स्वाईन फ्लू, एड्स, कोरोना विषाणूचा फैलाव कसा वाढतो, असे समजावून सांगताना आठले म्हणाले, प्राण्यातून माणसात, माणसातून प्राण्यात आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांनीदेखील सजग राहणे गरजेचे आहे. रेबीज विषाणूदेखील घातक आहे. हा प्राण्यांतून माणसाला, प्राण्याला होतो. त्यामुळे कुत्री, मांजरे पाळण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.
 
कोविड महामारीमध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लशींने मोठी कामगिरी बजावली आहे. पीसीआर तसेच रॅपिड अ‍ॅटिजेन चाचण्यांनी रोगनिदानाला गती दिली. जैवशास्त्रामुळे रोगकारकांचे जनुकीय स्वरुप समजून त्यांच्याविरुद्ध प्रभावी उपाय शक्य झाले आहे. तरीही विषाणूंचे उत्परिवर्तन (डेटा, अ‍ॅमिक्रॉन) आणि अँबिायोटिक प्रतिकार यांसारखी आव्हाने कायम असल्याचे प्रा. आठले यांनी सांगितले. प्रस्ताविकव सूत्रसंचालन डॉ. मानसी देशपांडे यांनी केले.

Related Articles